Shri.Bramhachaitanya Gondavalekar Maharaj Pravachane
श्री.ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची प्रवचने
॥ श्रीराम ।।
श्री.ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची प्रवचने ‘नवीन नवीन शोध लागत आहेत आणि त्यामुळे नवीन सोयी होत आहेत. पण त्यामुळे मनुष्य खरोखर सुखी झाला आहे काय ? साहेबाच्या नव्या शोधानें मनुष्याच्या देहाला सुख मिळेल, पण खरे सुख मनाच्या अवस्थेवरच अवलंबून असल्यानें असे शोध कितीहि लागले तरी मनुष्य खरा सुखी होणार नाहीं. देहाला सर्वस्व मानून व त्याला सुखांत ठेवण्याच्या नादी लागून आत्म्याची कुचंबणा करण हें आत्मघाताचे लक्षण आहे. प्रत्येकानें निदान ज्याला प्रपंचांत पुरेसे मिळत आहे त्यानें आहे त्या परिस्थितीत समाधान मानून आपले लक्ष भगवंताकडे वळविलें आणि आपला काल त्याच्या नामांत घालविला तर जगांतील द्वेष, मत्सर, लोभ, क्षोभ, पुष्कळ कमी होतील व सामान्य मनुष्य सुखी राहील, मनुष्य भेटला की तो सुखी किती आहे हे मी पाहतों, इतर त्याच्या गोष्टी मी पाहात नाहीं. पण तुम्ही श्रीमंती, विद्या, मान यांवरून तो सुखी ठरवितां ! भगवंतावांचून मनुष्य कसा सुखी होईल ? प्रपंची माणसाच्या दुःखाची मला पूर्ण जाणीव आहे. ही जाणीव ठेवून मी तुम्हांला खात्रीने सांगतों कीं, प्रपंचातील कर्तव्यकर्मे करीत असतो भगवंताच्या नामांत राहा, राम तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाहीं.”
जीवनांत खरें समाधान कसें लाभेल ?
रोजच्या व्यवहारांत प्रपंचाच्या घडामोडींत भगवंताचे अनुसंधान कसे ठेवावें ?
मनुष्यजन्माचें निश्चित ध्येय काय आहे व ते साध्य करून
घेण्यास कोणतें साधन करावें ?
स्वतःच स्वतःचा उद्धार कसा करून घ्यावा ?
भगवंताचे नाम घ्यावें म्हणजे काय करायें ? या सर्व प्रश्नांचे अत्यंत घरगुती, व्यवहारी, सहजसुंदर व भगवंताच्या प्रेमाने ओथंबून भरलेल्या भाषाशैलीत केलेले विवेचन, म्हणजे भगवंतावर अकृत्रिम व निष्काम प्रेम करून तदाकार होऊन राहिलेल्या श्रीसचिदानंदस्वरूप महात्म्याचे अमृतमय बोलच !
|| श्रीराम जयराम जयजय राम ।।